NCP Crisis News  Sarkarnama
मुंबई

NCP Crisis News : चिन्हाची गरज नाही, आमचा पक्ष शरद पवारच; आयोगाच्या निर्णयानंतर आव्हाडांचा कॉन्फिडन्स!

Chetan Zadpe

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने आज बुधवारी (ता.7) राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना बहाल केले आहे. हा निकाल म्हणजे शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. यावर आता शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हांडांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "फार आश्चर्यकारक वाटतंय, असं नाही. ज्या दिवशी पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली गेली, त्याच दिवशी शंकेची पाल चुकचुकली होती. त्यानुसार ते घडलं आहे. आमची बाजू आम्ही आयोगाकडे स्पष्ट केली होती. आम्हाला माहिती होतं, चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं जाणार आहे. यातून शरद पवारांना अजित पवार गट मरणयातनाच देत आहे. ज्या माणसाने तुमचं संगोपन केलं, त्या माणसाकडून तुम्ही सगळं काढून घेतलं . आम्हाला चिन्हाची गरज नाही, आमचं चिन्ह शरद पवारच, " जितेंद्र आव्हाडांनी अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. (NCP Crisis News)

मोठा निर्णय -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचला होता. यावर आयोगात सुनावणी देखील पार पडली होती. 8 डिसेंबरला दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. या अनुषंगानेच लेखी म्हणणं सादर करण्यात आले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT