Kapil Patil, Suresh Mhatre Sarkarnama
मुंबई

Kapil Patil Vs Suresh Mhatre : खासदार म्हात्रेंची टीका कपिल पाटलांच्या जिव्हारी; म्हणाले,'मी काय कुणाच्या भरवशावर...

Deepak Kulkarni

Bhiwandi News : लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( शरद पवार) दाखल झालेल्या सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी भिवंडी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजपच्या कपिल पाटलांना पराभवाचा धक्का दिला होता. खासदार झाल्यानंतर म्हात्रे यांचं राजकीय वजन वाढलं. पाटील आणि बाळ्यामामांमध्ये आरोप- प्रत्यारोपांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम सुरु आहे. आता कपिल पाटलांनी मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही असं म्हणत डिवचलं आहे.

भाजप नेते कपिल पाटील (Kapil Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.ते म्हणाले,माझी हिम्मत कुणाला बघायची गरज नाही,माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. तसेच मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही असा टोलाही पाटील यांनी म्हात्रे यांना लगावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उतरणार असल्याची चर्चा आहे. यावर विद्यमान खासदार(MP) सुरेश म्हात्रे यांनी हिंमत असेल तर पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असं ओपन चँलेज माजी केंद्रीय मंत्री पाटलांना दिलं होतं. त्या आव्हानाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी म्हात्रे यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे.

कपिल पाटील म्हणाले, त्याला विचारायची गरज काय असा सवाल करत तुझ्या पक्षाचं बघ ,माझ्या पक्षाची तिकीट वाटू नको,लोकांनी सेवा विकास करण्याची संधी दिली आहे, विकास करायचा विचार करा असा पलटवार कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या टीकेवर केला.

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना टीआरपी मिळत नाही. माझी हिंमत कुणाला बघायची गरज नाही.माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे.मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही . मला पक्षाने सांगितलं लढा तर मी लढणार ,मला काय याची परवानगी पाहिजे का ? आम्ही हार पचवून पाच तारखेपासून कामाला लागलो ,यांना विजयही पचवता आलेला नाही अशी जहरी टीकाही माजी खासदार कपिल पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) पक्षाच्या सुरेश म्हात्रेंवर केली

दोन समाजांत तेढ निर्माण करायचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते चुकीचं आहे.मुंबई घडवण्यात उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे ,मला गृहमंत्री बनवलं तर मी राज्यातील दूषित वातावरण शांत करणार असं वक्तव्य सपाचे नेते व आमदार अबू आझमी केलं होतं. त्यावर कपिल पाटलांनी प्रतिक्रिया देताना समाजवादी पार्टीच्या अबू आझमींना जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये त्यांची सत्ता होती तेव्हा तिथे का नाही केलं,त्यासाठी योगींना यावं लागलं. मुंबईच्या जडणघडणमध्ये जास्तीत जास्त लोकं मराठीच होती ,मात्र मी असा दावा करणार नाही ,मुंबई मेट्रोपोलिटिन सिटी आहे. इथे सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे ,मुंबईच्या जडणघडणीत सर्वांच योगदान आहे ,त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते चुकीचं आहे अशा शब्दांत पाटील यांनी आमदार अबू आझमींना खडे बोल सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT