Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; मंत्रिमंडळ बैठकीत वळसे पाटलांवर सर्वपक्षीय नेते नाराज

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जाहिर कार्यक्रमात हातात तलवार घेऊन उंचावल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला करण्यात आला. त्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणाचे पडसाद उमटले. शेख यांच्यासह अन्य काही मंत्र्यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना लक्ष्य केल्याचे समजते.

शेख आणि गायकवाड यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. कंबोज यांनी ट्विट करत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना कारवाई करण्याची विनंती केली होती.

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री आधीच तुरूंगात आहेत. तर काही मंत्री व आमदारांची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहेत. त्यातच राज्य सरकारकडूनही काँग्रेसच्या (Congress) दोन मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचे पडसाद गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचे समजते. शेख यांनी या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

काँग्रेससह शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांनी वळसे पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सरकार आपले असूनही आपल्याच मंत्र्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल कसे केले जात आहेत, असा सवाल मंत्र्यांनी केला. या नाराजीनंतर आता या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती केली जाणआर आहे. कोणत्या कारणांमुळे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल ही समिती सादर करेल, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे समजते.

शेख यांनी कंबोज यांना दिलं होतं प्रत्युत्तर

काही दिवासांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष केला होता. हा जल्लोष करताना भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही कार्यकर्त्य्यांसह जल्लोष साजरा केला. त्यावेळी त्यांनी तलवार दाखवली होती. त्यानंतर मुंबई पोलिस मोहीत कंबोज यांच्या घरी पोहोचले होते, त्यावरूनच काँग्रेस नेत्यांनाही तोच न्याय लागू होणार का? असा सवाल कंबोज यांनी केला होता. याबाबत बोलताना कार्यक्रमात शीख समाजाने परंपरेप्रमाणे तलवार दिली. अशा तलवारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही दिली आहे. पण आम्ही तलवार घेऊन लोकांमध्ये नाचलो नाही, दहशत नाही पसरवली, हा फरक आहे, असे प्रत्युत्तर शेख यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT