mantralya
mantralya 
मुंबई

महाराष्ट्र बंद आंदोलन - मंत्रालयात शुकशुकाट ! 

सरकारनामा

मुंबई :  भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी पाळण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'चा परिणाम मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर आणि अभ्यागतांवर झाला. जेमतेम 20 ते 25 टक्‍क्‍यांच्या आसपास कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

राज्यात आणि मुंबईत काही अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला असला, तरी आज सकाळपासूनच रस्ते आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मंत्रालयातील कर्मचारी वेळेत पोचू शकले नसल्याने केवळ 20 ते 25 टक्के एवढीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

 मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध भागांतील लोक आपल्या कामानिमित्त मंत्रालयात येतात. मंत्रालयात प्रवेशासाठी तीन प्रवेश पास खिडक्‍यांवर आज तुरळक गर्दी होती. 'बंद'च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात करण्यात आलेल्या फौजफाट्यामुळे मंत्रालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT