jitendra awhad sarkarnama
मुंबई

बंगल्यात नेऊन अभियंत्याला मारहाण : जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीनही!

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना एप्रिल 2020 रोजी मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तब्बल दीड वर्षांनंतर आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यांना तातडीने जामीनही मिळाला.

आव्हाड यांच्यासारख्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे अशी मागणी सोमय्या यांनी केली. तसेच या संदर्भात भाजप राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

५ एप्रिल 2020 रोजी ऐन लॉकडाऊन काळात ठाण्यात मध्यरात्री सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलिस शिपायांचा सहभाग होता असे सोसायटी सीसीटिव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले होते. कोरोना काळातही हे प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगलेच गाजले आणि राज्यभर त्याची चर्चाही झाली होती.

याबाबत करमुसे यांनी उच्च न्यायालयात याचिका करून आव्हाड यांनाही आरोपी करण्याची मागणी केली होती. आव्हाड यांच्या बंगल्यातील त्या दिवसाचे सीसी टीव्ही चित्रीकरण तातडीने ठाणे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT