Pratap Sarnaik Latest Ndews
Pratap Sarnaik Latest Ndews Sarkarnama
मुंबई

अमोल मिटकरींनी माकडचाळे केले नसते तर...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (ता.२४ ऑगस्ट) विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की व शिवीगाळी सारखा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत.

झालेल्या या प्रकारावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्याकडून जोरदार टीका केली जात असून भाजप (BJP)आणि शिंदे गटाकडून देखील विरोधकांवर टीका केरण्यात येत आहे. याप्रकरणी या संपूर्ण घटनेचे साक्षीदार असलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य आहेत. मात्र, असा प्रकार कधी बघितला नव्हता. याप्रकरणी सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असो दोषी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

प्रताप सरनाईक म्हणाले, मी गेली १५ वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यावर अनेकदा आम्हीही आंदोलन बघितले आहेत किंवा अनेकदा आम्ही देखील आंदोलन केले आहेत. मात्र आज जो प्रकार घडला असा माझ्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच बघितला गेला नसेल. गेल्या तिन दिवसांपासून विरोधीपक्षांच्या सदस्यांनी आंदोलन केलं '५० खोके एकदम ओक्के',अशा घोषणा दिल्या आणि आमच्यावर विविध आरोप केले. मात्र, त्यांनी केलेले आरोप हे किती खोटे आणि चुकीचे आहेत. हे सांगण्यासाठी आम्ही आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यामध्ये ते अडीच वर्ष सत्तेत असतांना त्यांनी काय घोटाळे केले. हे आम्ही बॅनर आणि घोषणेच्या माध्यमातून सांगत होतो. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखण्याचे काही कारण नव्हते.

पुढे सरनाईक म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतांना विरोधी पक्षाचे सदस्य यामध्ये कॅाग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी येथे येऊन आमच्या सदस्यांना गाजराच्या माळा दाखवल्या, आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबाबच आर्वाच्य भाषेत ते घोषणा देत माकड चाळे करत होते. यावरून त्यांच्या पोटात दुखत आहे हे दिसत होत. हे (महाविकास आघाडी) सत्तेत असतांना यांनी काय केलं हे आम्ही सांगत होतो. यांनी तिन दिवस आंदोलन केलं तेव्हा आम्ही काही म्हणालो नव्हतो. मात्र यांनी ये-जा करत असतांना आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यांची वाट अडवली होती. याबरोबरच आर्वाच्य भाषेत घोषणा करत होते. मात्र आम्ही शांत होतो. पण आजही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतांना त्यांनी अशी परिस्थिती ओढवायला नको होती, असे सरनाईक म्हणाले.

यावेळी कोण काय म्हणत होते. हे मी ऐकले आहे. अमोल मिटकरी हे स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी माकडचाळे करत असतात. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास ते एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहेत. विधीमंडळासारख्या पवित्र सभागृहासमोर असे कृत्य करणाऱ्यांवर त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि याप्रकरणी सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातील दोषी सदस्यांवर कारवाई करायला पाहिजे. याबाबत मी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे,असेही सरनाईक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT