Uddhav Thackeray, Sanjay Shirsat
Uddhav Thackeray, Sanjay Shirsat sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेही शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत; संजय शिरसाट थेटच बोलले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखती दिली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. शिवसेनेतून पालापाचोळा गेला आहे. पानझड झाल्यानंतर झाडाला नवीन पालवी फुटते. त्या प्रमाणे शिवसेनेला उभारी मिळेल. गेले ते पालापाचोळा आहेत, जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहे, असा हल्लाबोल त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला. त्यानंतर शिंदे गटानेही ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठे विधान केले आहे. शिरसाट म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ही होऊ शकत नाहीत, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय शिवसेना प्रमुख कोणीही होऊ शकत नाही. असे शिरसाट यांनी म्हटले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आज उध्दव ठाकरेंची मुलाखत पाहिली, मुलाखत घेणाऱ्याचे आचर्य वाटले. या मुलाखतीत त्यानी कचऱ्यातून उचलल असे म्हटले आहे. त्याचे फार वाईट वाटले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे आहेत. त्यांनी म्हटले मात्र, ते फक्त त्यांचेच नाहित तर संपुर्ण जगाचे आहेत.

आज मुख्यमंत्री कार्यालयात जा तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचे फोटो बघा, कृपया आज त्यांची उंची तुम्ही कमी करु नका, असेही शिरसाट म्हणाले. एखाद्याला खाली खेचायच काम तुम्ही करु नका, शिवसेना प्रमुख अमचे दैवत आहेत. आम्हाला पालापाचोळा म्हणु नका, असेही शिरसाट म्हणाले.

कोणीही जुना नेता तुमच्या बाजूला बसत नाही, याचा विचार करा, असा टोला शिरसारट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही पाला पाचोळा नाहित. आम्ही आमची हयात शिवसेना वाढीत घालवली, त्याचा विचार करा. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले ते चुकीचे आहेत. आजारपणात कही घडले नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले.

आमची चिंता तुम्ही करू नका, आम्ही कशात जायचे. आमचा रस्ता आम्ही पाहू ना. ज्या खोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्धाव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा झाली, त्याबद्दल काही बोलायचे नाही. मात्र, त्यांचा संपर्क होत होता, मात्र यांनी केले नाही. संजय राऊत यांच्या सारख्यानी खोडा घातला, असा आरोप शिरसाट यांनी केला. शरद पवार मोठें नेते आहेत मी काही बोलणार नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, बाळासाहेबांचे ठाण्यावर प्रेम होते. शिवसेनेचे पाहिला भगवा हा ठाण्यावर फडकला होता. त्याच ठाण्यातून उठाव झाला? त्यावर ठाकरे म्हणाले, जे गेले ते पालापाचोळा आहे. ठाण्यातील जनता आजही शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.

झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे का? यावर ठाकरे म्हणाले, सडलेली पाने झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळे काही मिळाले, रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती झाडाकडून सगळे घेऊनही गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसे झाले आहे हे दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. मात्र, दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि जातो. झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे, आता नवीन कोंब फुटायला लागले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT