MP Navneet Rana, CM Uddhav Thackeray
MP Navneet Rana, CM Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

राज्य कसं चालवायचं, हे ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं! नवनीत राणांचा पुन्हा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सोमवारी दिल्लीला रवाना झाले. हनुमान चालिसा प्रकरणावरून दोघांना अटक केल्यानंतर बारा दिवस तुरुंगात होते. तुरुंगात असताना पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणा दांपत्याने केला होता. त्याची तक्रार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Navneet Rana Latest Marathi News Update)

तुरूंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळीही त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिलं. महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ निवडा, मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवते. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक जिंकून दाखवा, असं आव्हान राणांनी दिलं आहे.

त्यानंतर सोमवारी राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना झाले. त्याआधी माध्यमांशी बोलताना राणांनी पुन्हा ठाकरेंना लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनीही पाच वर्षे राज्य चालवलं. पण अशाप्रकारे सुडाचं राजकारण त्यांनी कधी महाराष्ट्रात केलं नाही. कोणत्या भावनेनं राज्यकारभार करायला हवा, राज्य कसं चालवायचं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं राणा यांनी म्हटलं आहे.

पोलीस कोठडीत आमच्यासोबत जे घडलं त्याची तक्रार दिल्लीत करणार आहे. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरेंमुळे हे घडले. तुरुंगात सर्व सारखे असतात. लोकप्रतिनिधींनाही कैद्याप्रमाणे वागणूक दिली जाते. पण त्याला काही नियम आहेत, असं राणा म्हणाल्या. संजय राऊत हे पोपट असून रवी राणांच्या भाषेत त्यांना चवन्नी छाप म्हणता येईल. त्यांनी आम्हाला 20 फूट खड्ड्यात गाडू, असं विधान केलं होतं. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्याचीही तक्रार दिल्लीत करणार असल्याचे राणांनी सांगितले.

दरम्यान, न्यायालयानं जामीन देताना राणा दांपत्याला माध्यमांशी न बोलण्याची अट घातली आहे. या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामिनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आज सकाळी मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT