Sanjay Raut : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याचे स्पष्ट संकेत ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी नुकतेच दिले आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने रविवारी महाराष्ट्राचा निरोप घेतला.त्यानंतर राहुल गांधी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी रविवारी रात्री राऊतांना फोन केला, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. राऊतांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे.
"भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती.असे म्हणाले.राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..,"असे टि्वट राऊतांनी केलं आहे.
"शिवसेनेने सावरकरांच्या हिंदुत्वाचा कायमच पुरस्कार केला आहे. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना जुने वाद उकरुन काढले जात आहेत, भाजपने राजकारणासाठी हा मुद्या उचलला आहे, "असे राऊत यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
राऊतांच्या या विधानामुळे सावरकरांचा वाद आघाडी सरकारच्या मुळावर येणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. सावकरांवरील वादग्रस्त विधानानंतर राहुल गांधी यांचा भाजप, शिंदे गट, मनसेने महाराष्ट्रात निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी राऊतांना फोन केला असला तरी त्यांच्याबाबतची नाराजी ठाकरे गटात अद्यापही कायम आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.