Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

BMC Election : 'मुंबईत 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी कुणाच्या दारात गेली नाही, शिंदेंचे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढतायत हे लाजिरवाणं...'

Sanjay Raut On Eknath Shinde BJP Alliance : 'जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. तिथे एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवत आहेत, हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. 2017 साली भाजपची जी भूमिका झुगारून आम्ही स्वतःच्या बळावर लढलो पण लाचारी पत्करली नाही.'

Jagdish Patil

Mumbai News, 30 Dec : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचं जागावाटप देखील पूर्ण झालं आहे. मात्र, आता याच जागावाटपावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जागावाटपासाठी आणि युतीसाठी एकनाथ शिंदेंचा गट त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भाजपने त्यांना जागा दिलेल्या आहेत. हे हास्यास्पद आणि लाजिरवाणी आहे. शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढत आहेत, अशा शब्दाच राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत मुंबईतील महायुतीच्या जागावाटपा संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, 'आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती. पण अशी वेळ आली आहे की, स्वतःला अमित शहांची शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भाजपच्या दारात जागा मागण्यासाठी उभे राहावं लागत आहे.

त्यांनी फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे. ही त्यांची शिवसेना आहे. यापूर्वी मुंबईत ६० वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही. पण एकनाथ शिंदे यांचा गट युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहांच्या दारात गेले आणि आता भाजपने त्यांना जागा दिल्या. ही हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे.', असं राऊत म्हणाले.

तर यावेळी त्यांनी आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. 140 च्या आसपास जागा आम्ही लढत असून राज ठाकरे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणावर जागा लढत आहेत, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली. तर राष्ट्रवादीलाही आम्ही जागा देत आहोत. पण मला वाईट वाटलं की, शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढत आहेत.

जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती. शिवसेनेच्या मर्जीने युती होत होती. तिथे एकनाथ शिंदेंसारखे लोक लाचार मराठी माणसाचे दर्शन घडवत आहेत, हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी यावेळी केली. शिवाय यावेळी त्यांनी 2017 साली भाजपची जी भूमिका झुगारून आम्ही स्वतःच्या बळावर लढलो पण लाचारी पत्करली नाही.

जेव्हा भाजपने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो आणि आम्ही आमचे राजकारण केले, असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून युती तुटल्याचं उल्लेख केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT