Jitendra Awhad Vs Anna Hajare Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Vs Anna Hajare : माझ्या ट्विटमुळे अण्णांना जाग आली; अब्रुनुकसानीच्या दाव्याला न जुमानता आव्हाडांचा पुन्हा निशाणा...

Chetan Zadpe

Mumbai News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार टीका टिप्पणी सुरू झाली आहे. आव्हाड यांनी हजारे यांचा फोटो ट्विट करत 'या व्यक्तीमुळे देशाचे वाटोळे झाले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही,' अशा शेलक्या शब्दांत टीकेची तोफ डागली होती. यामुळे हजारे यांनी आव्हाडांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यावरून पुन्हा एकदा वाद-विवाद सुरू झाले आहेत. (Latest Marathi News)

अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. तसेच त्यांनी आव्हाडांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही दिला आहे. हजारे म्हणाले, "माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं नाही, तर माझ्या आंदोलनामुळे अनेक देशहिताचे कायदे झाले. मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात, पण माझ्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे वाटोळे झालं असल्याचं नाकारता येत नाही, असा टोला हजारेंनी लगावला होता.

दरम्यान, अण्णा हजारेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आव्हाडांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, आव्हाड म्हणाले, "माझ्या एका ट्विटमुळे यांना जाग आली. कोर्टात खेचतो ह्याला, म्हणजे मला असे ते पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले, बघू उद्यापासून जागे राहतात का," असा खोचक टाेला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT