Nana Patole Vs Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Nana Patole Vs Eknath Shinde : जरांगेंच्या उपोषणावर नाना पटोलेंना संशय, तर मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला...

Chetan Zadpe

Mumbai News : मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जरांगे यांचं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल केला होता. पटोलेंच्या या आरोपाला आता मुख्यमंत्र्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "नाना पटोले यांना सध्यातरी महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही. म्हणून त्यांची तडफड दिसून येते. काहीतरी गंभीर आरोप केला की त्याची दखल घेतली जाईल, असं त्यांना वाटत असावं. पटोले माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं. यात एकनाथ शिंदेंचा किंचित तरी हात आहे का ?" अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते नाना पटोले ?

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळेस आले, आपल्याला फक्त बोलून जायचं आहे, ते म्हणाले. हे दोन समाजामध्ये भांडण लावणारं सरकार आहे. यांनीच जरांगे पाटलांना उपोषणावर बसायला लावलं होतं. हेही आता सिद्ध झालं आहे. लाठीचार्ज झाला म्हणून तर फडणवीसांनी माफी मागितली, असे नाना पटोले म्हणाले होते.

Edited By - Chetan Zadpe

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT