Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

आईच्या मृत्यूनंतरही वानखेंडेंनी तिच्याबाबत बोगसपणा केला ; मलिकांचा आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''धर्म बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र उपयोगी नसते, त्यासाठी गॅझेट करावे लागते. समीर वानखेडेंनी हे काही केले नाही. संपूर्ण कुटुंबाने आपली दुहेरी ओळख ठेवली आहे. त्यांच्या वडीलांनी दाऊद, ज्ञानदेव अशी दुहेरी ओळख ठेवली आहे. बहिणीनीनेही तेच केले असून समीर यांनीही दुहेरी ओळख ठेवली आहे,'' असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुरुवारी टि्वट करीत नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी याबाबतचे पुरावे आपल्या ट्विटमध्ये जोडली आहेत. नवाब मलिकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आणखी एक फर्जीवाडा, अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी.

नवाब मलिक म्हणाले, ''समीर वानखेंडेंनी बनावट दाखल्यांचा आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र घेतले आणि नोकरी मिळवली. त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ओशिवरा दफनभूमीत दफन करण्यात आले, तिथे आईच्या धर्माचा उल्लेख १४ एप्रिल २०१५ रोजी मुस्लिम लिहिले आहे. दुसर्‍या दिवशी महापालिकेत मृत्यूची नोंद करताना हिंदु अशी केली. आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी आईबाबत असा बोगसपणा केला,''

परमबीर सिंहावर कारवाई होईल..

परमबीर सिंह यांच्याबाबत मलिक म्हणाले, ''परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला अन् तेच फरार होते.

याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. पण आरोप करणारे परमबीर सिंह हे मे महिन्यापासून फरार होते. त्यांच्याविरोधात ४ गुन्हे खंडणीचे दाखल आहेत आणि एक आपल्या ज्युनियर अधिकार्‍यांच्या छळाचा गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना फरार घोषित केल्यानंतर ते परतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी सांगितले, आपल्याला मुंबई पोलिसांपासून धोका आहे, हे आश्चर्यकारक आहे. तिथे त्यांनी अटकेपासून संरक्षण मागितले आहे. पण परमबीर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल,''

भाजपचा डाव कळाला..

एसटी संपाबाबत मलिक म्हणाले, ''या देशात कोणतेही रोड ट्रान्सपोर्ट सरकारच्या मालकीचे नाही. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, जिथे लालपरी सेवा महामंडळ माध्यमातून आहे. सरकारने मदत देण्याची भूमिका स्वीकारली आहे. पण ज्या पद्धतीने भाजप नेते विलिनिकरण मागणी घेऊन लोकांना भडकावत होते. हा निर्णय सरकारने केला असता तर विविध महामंडळ सगळे कर्मचारी हीच मागणी केली असती,कर्ज काढून पण पगार देऊ शकले नसते,'' भाजप नेते दिशाभूल करून लोकांना भडकावत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा झाली. पगार वेळेत देण्याची घोषणाही झाली आहे. भाजपला कळून चुकलं दिशाभूल आता करता येत नाही, त्यांना राजकीय डाव कळाला आहे,'' असे मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT