Jitendra Awad
Jitendra Awad sarkarnama
मुंबई

Jitendra Awad यांच्या जामीनानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रंगणार राजकीय नाट्य

सरकारनामा ब्युरो

Jitendra Awad : हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल (शनिवारी) न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आवारात जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. (Jitendra Awad latest news)

आव्हाड म्हणाले होते की, मी पोलिस स्टेशनमध्ये असताना चाणक्याचा पोलिसांना वारंवार फोन येत होता. माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मात्र, हे चाणक्य कोण? हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते.

कळवा खाडीवर ठाणे महापालिकेने नवा पूल बांधला आहे. या पूलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यासपीठावर राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तीनही नेत्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आज जोरदार राजकीय जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना मारहाण करत “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणीआव्हाड यांना अटक केली होती. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटीशर्तींसह १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते," असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे."माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,"असे आव्हाड म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी आव्हाडांवर सडकून टीका केली होती. फडणवीस म्हणाले होते, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल आहे. त्यामुळे आव्हाड हे कायमच कुठल्याही गोष्टीचं अशाप्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपटगृहात जो तमाशा केला, जी मारहाण केली, त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,"जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई केली ती कायदेशीर आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही किंवा हे कोणी मुद्दामहूनही केलेलं नाही," या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT