Jeetendra Awhad
Jeetendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awad : आव्हाडांवर कारवाईसाठी दबाब आणणारा तो 'चाणक्य' कोण ?

सरकारनामा ब्युरो

Jitendra Awad : ठाण्यात “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांना आज (शनिवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आव्हाडांनी गंभीर आरोप केले. (Jitendra Awad latest news)

पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते," असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे. हा चाणक्य कोण ? याची सध्या चर्चा सुरु आहे.

"माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,"असे आव्हाड म्हणाले. आव्हाडांवर न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. लवकरच निर्णय येणार आहे.

आव्हाडांच्या विरोधात कलम ३२३ आणि कलम ५०४ लावण्यात आले. आव्हाड यांना रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. वर्तकनगर ठाण्यात रात्री आव्हाडांचा मुक्काम होता. आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

७ नोव्हेंबर रोजी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्ते ठाण्यातील विवियन मॉल येथे घुसले. या वेळी त्यांनी “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोफत शोचे आयोजन केले. त्यानंतर हा वाद वाढतच गेला.

"आमची इच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांविरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आव्हाडांच्या अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आम्हा सर्वांना या कामासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड यांना अटक होत असेल, तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आव्हाड यांना अटक करणे म्हणजे राज्यात ब्रिटिशराज आले आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी व आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जात आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT