Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी डिवचलं आहे.
"माझ्यामुळे 50 दिवस पक्षाची हेडलाईन होत असेल ना, मी नैतिकतेने म्हटले असते, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवण्यासाठी इथं आलेली आहे. पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. मी एक पाऊल माग घेतले असते आणि 'दूध का दूध अन् पाणी का पाणी', मी केले असते", असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषदेत घेत राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाकडे लक्ष वेधताना राज्याच्या ढासळलेल्या सामाजिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
खासदार सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना म्हटल्या, "अंजली दमानिया, भाजप (BJP) आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांचे स्टेटमेटं पाहिले आहे, 'ऑफिस ऑफ प्राॅफिट'मध्ये एवढा मोठा आरोप झाला आहे, सोनियांवर देखील असे आरोप झाले होते, तेव्हा त्या मंत्री देखील नव्हत्या, नुसत्या खासदार होत्या. तरी सोनिया गांधींनी नैतिकतेवर राजीनामा दिला होता. अशी किती उदाहरणे आहेत". हा विषय राजकीय नाही. सामाजिक विषय आहे. निती आयोग देखील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र खाली गेला आहे, या सगळ्यांचे 'रिफ़्लेक्स' आहे, असेही खासदार सुळे यांनी म्हटले.
'राजीनामा मागण्यात, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे. आम्ही राजीनामा नैतिकतेवर मागतो. संविधानाच्या चौकटीत मागतो. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती. त्यांचे वर्ष-वर्ष जेलमध्ये गेले. बजरंग आप्पा, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड किंवा मी असेल, आम्ही सर्व विरोधक आहोत. सत्तेतील तिन्ही पक्षातील लोकं म्हणत आहेत, त्याचे काय?,'असा सवाल खासदार सुळे यांनी केला.
मंत्री धनंजय मुंडे यांना डिवचतांना, खासदार सुळे यांनी 'माझ्यामुळे 50 दिवस पक्षाची हेडलाईन होत असेल ना, मी नैतिकतेने म्हटले असते, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवण्यासाठी इथं आलेली आहे. पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. मी एक पाऊल माग घेतले असते आणि दूध का दूध अन् पाणी का पाणी मी केले असते', असा टोला लगावला.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना खूप माहिती आहे, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यावर खासदार सुळे म्हणाल्या, 'आमची तयारी आहे. आम्ही फकीर आहोत.आम्हाला काही प्राॅब्लेम नाही. रामकृष्ण हरी. जरूर चौकशी करावी". 50 दिवस, या काळात, कॅमेरे, तंत्रज्ञान, एवढी टेक्नाॅलाॅजी आहे, पन्नास दिवस झाले, एक खुनी मिळत नाही. आहे कोठे तो? फरार असेल, तर कुठे गेला? 'एआय'मध्ये गेला का? काय चेष्टा करताय का? या राज्याची आणि देशमुख कुटुंबियांची! एक फरार माणूस मिळत नाही. काय करते आहे यंत्रणा? हा प्रश्नच आहे, असे प्रश्न देखील खासदार सुळे यांनी उपस्थित केले. 50 दिवसापूर्वी या राज्यात एका मुलाची हत्या झाली. सरकारने नैतिका ठेवून बीड आणि परभणीतील दोन्ही कुटुंबाना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.