The OBC reservation issue has gone to the state government court
The OBC reservation issue has gone to the state government court 
मुंबई

ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकार न्यायालयात : नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : ओबीसी आरक्षण OBC Reservation प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचे नुकसान झाले आहे, भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. राज्य सरकार या बाबतीत न्यायालयात गेले आहे, अशी माहिती काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. The OBC reservation issue has gone to the state government court

याबाबत बोलताना श्री. पटोले म्हणाले की, ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. २०१७ मधे हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही.

केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही, त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. 

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच 

विधानसभा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होणार आहे, येत्या अधिवेशनात ही निवड करण्यात येईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.  ते म्हणाले की, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यावेळी अध्यक्ष निवड होईल. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सत्तेतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ, अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा असेल, मात्र त्यावर सत्तेतील तिन्ही पक्षाची सहमती असेल. निवडीच्या दिवशीच अध्यक्ष पदाचे उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT