मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधित ४२ रुग्ण आहेत. सर्वांची परिस्थिती ठीक आहे. आतापर्यंत ८०० च्या दरम्यान संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४२ सोडून सर्व जणांच्या चाचण्या 'निगेटिव्ह' असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी जनतेला दिलासा दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री डाॅ. राजेश टोपे रोजच्या रोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जनतेला माहिती देत आहेत. आजही डाॅ. टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "८०० च्या दरम्यान आपण टेस्ट केल्या त्यात ते ४२ सोडून उर्वरित रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कोरोना उपचारासाठी पुण्यात केईम सुरू होईल. दोन ते तीन दिवसात हाफकीन आणि जेजेही सुरू होईल,''
पुण्यात एक नवीन रुग्ण आढळला आहेत असे सांगत पुण्यातील एनआयव्हीला आपण भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बाहेर देशातून आलेल्यांची व ज्यांची लक्षणे दिसतील त्यांच्याच तपासण्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना हा आजार बरा होणार आजार आहे. त्यामुळे संशयित रुग्णांबाबत कुठलाही दुजाभाव करु नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोन्टीनमधून पळून जाणाऱ्या ना कोणतीही शिक्षेची तरतूद अद्याप नाही, अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.