Mumbai News: माथाडी कामगारांचे सल्लागार मंडळ आणि विविध संस्थाचे प्रतिनिधी असलेले बोर्ड रद्द करण्याबाबत विधेयक बुधवारी दुपारी विधानसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकाला माथाडी संघटनांचा विरोध आहे.
याबाबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेत माथाडी कामगारांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. यानंतरही आता सरकार काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
राज्य सरकारचे कामगार मंत्रालय, माथाडी कामगारांचे सल्लागार मंडळ आणि माथाडी बोर्ड रद्द करण्याबाबत विधानसभेत विधेयक मांडणार आहे. या विधेयकामुळे माथाडी कायद्यालाच धोका असल्याचं माथाडी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं, याकडे माथाडी कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.
यावर बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, "1969 ला माथाडी कामगार कायदा झाला. या कायद्यामुळे कष्टकरी माथाडी कामगारांना माणूस म्हणून जगण्याला सुरुवात झाली. दररोज ओझी उचलून, घाम गाळून अपमानास्पद वागणूक मिळत होती, तर कष्टाचे दामही मिळत नव्हते. हा कायदा झाल्यानंतर माथाडींना न्याय मिळाला".
"आता हा कायदा अडचणीत येईल. त्यामुळे असे विधेयक मंजूर करू नये, यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटलो असून फडणवीस, पवार यांनी याबाबत सकारात्मक विचार करू", असे आश्वासन दिले असल्याचे नरेंद्र पाटलांनी सांगितले. तसेच आज विधेयक मांडल्यानंतर आपण पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही नरेंद्र पाटलांनी सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.