Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीबाबत कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी ते माध्यमांशी बोलत होते.
सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत राज ठाकरे म्हणाले, "निवडणुकीआधी कोणासोबत आणि निवडणुकीनंतर कोणासोबत, अशी मतदारांची प्रतारणा मी करणार नाही. मला ते जमणार नाही. निवडणुकीत एकासोबत आणि नंतर दुसऱ्यासोबत जाण्याला राजकारण म्हणत असेल, तर मी त्या राजकारणासाठी नालायक आहे,"
"देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी युती भावनिक आहे तर राष्ट्रवादीसोबत पुढील काळात भावनिक होईल. जनता शांत बसल्याने राजकारण्यांना फायदा होतो. लोकांनी रंग बदलणाऱ्या राजकारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे," असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना स्वबळाचा नारा दिला आहे. " खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“एखाद्या पदावर बसल्यावर काम झालं पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावं लागेल, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, तडजोड करणार नाही. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही,” असे राज ठाकरे यांनी गुरुवारी नमूद केलं.
कोकण हा मनसेचा बालेकिल्ला तयार करण्याचा राज ठाकरे यांचा मानस आहे, सध्या ते पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.