Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT MNS Alliance : राज-उद्धव युतीची चर्चा सातासमुद्रापार? दोन्ही बंधू एकाच वेळी परदेशात गेल्याने चर्चांना उधाण

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यभरात सध्या शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांना सुखावणाऱ्या चर्चा सुरू आहेत. कारण मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतच्या चर्चा राज्यात सुरू आहेत. या चर्चा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यामुळेच सुरू झाल्या आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 22 Apr : राज्यभरात सध्या शिवसैनिक (ठाकरे) आणि मनसैनिकांना सुखावणाऱ्या चर्चा सुरू आहेत. कारण मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतच्या चर्चा राज्यात सुरू आहेत.

या चर्चा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यामुळेच सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी आपण एकमेकांमधील किरकोळ वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार असल्याचं वक्तव्य दोन्ही नेत्यांनी केलं आहे. त्यामुळे आता मनसे व ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, युतीची चर्चा नेमकं कोण सुरू करणार आणि ती कुठे होणार याबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सध्या उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईत परतणार आहेत. तर राज ठाकरे देखील परदेशात गेले असून ते 29 एप्रिल रोजी मुंबईत परत येणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे.

त्यामुळे युतीच्या चर्चा परदेशात होणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. युतीच्या चर्चा सुरू असताना ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे आता दोन्ही बंधू मुंबईत आल्यानंतर ते नेमका काय निर्णय घेणार? ते खरंच युती करणार का? की परदेशात असतानाच त्याचं युतीबाबतचं बोलणं होणार असे अनेक प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत.

नेमकं प्रकरण काय

महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोललताना, "महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे", असं म्हणत राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिले होते. राज यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. मात्र, त्यांनी अटीशर्थीसह युतीची तयारी दर्शवली.

ते म्हणाले, माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीच पण तरीही मराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायला मी तयार आहे. पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या आणि युतीच्या चर्चेसाठी या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT