Pandharpur
Pandharpur sarkarnama
मुंबई

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारपासून मुक्त होणार? डॉ. सुब्रमण्यम स्वामींची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसावा, यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Dr. Subramaniam Swamy) हे मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करणार आहेत. नवी दिल्ली येथे आज झालेल्या बैठकीनंतर डॉ. स्वामी यांनी याचिका दाखल करण्याचे जाहीर केले.

स्वामी यांच्याकडून ७ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. विधिज्ञ सत्या सब्रवाल, विधिज्ञ विशेष कोनोडीया यांच्यामार्फत मुंबई न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला डॉ. सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येथे भेट देणार आहेत. यावेळी ते वारकरी संप्रदाय व विठ्ठल भक्तांची बैठकही घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास आहे. विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असतात. हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. पंढरपूर (Pandharpur) हे वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला वेगळेच महत्त्व आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेला महत्व आले आहे. याप्रकरणी आगामी काळात न्यायालयाकडून निर्देश दिले जातात, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT