Sambhajiraje Chhtrapati News, Sambhajiraje News, Political News in Marathi
Sambhajiraje Chhtrapati News, Sambhajiraje News, Political News in Marathi Sarkarnama
मुंबई

माझी ताकद 42 आमदार नाही तर..! संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्युरो

SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे जाहीर केले. माझी ताकद मला बघायची आहे. माझी ताकद ही 42 आमदार नाही. माझी ताकद जनता आहे, म्हणून मी जनतेत चाललो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांचे लक्ष्य 2024 च्या निवडणुका असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे यांनी स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो आहे, असं सांगितले. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. 2009 ची लोकसभेची निवडणूक मी हरल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवकांना सगळ्यांना संघटित करण्याची लोकांची इच्छा होती. आज ही संधी आली आहे, असं संभाजीराजे म्हणाले. (SambhajiRaje Chhatrapati not contesting Rajya Sabha Election)

मला कुणाचाही द्वेष नाही. माझी स्पर्धा माझ्यासोबत आहे. स्वराज्याची स्थापना करून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या पाठिशी राहण्यासाठी यामाध्यमातून उभे राहणार आहे. स्वराज्य ही संघटना सक्षम करणार आहे. 2009 वेळी जसा फिरलो तसा पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. माझी ताकद मला बघायची आहे. माझी ताकद ही 42 आमदार नाही. माझी ताकद जनता आहे, म्हणून मी जनतेत चाललो आहे. माझा दौरा उद्यापासूनच सुरू होईल, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

भाजपवर नाराजी नाही का?

भाजप पुरस्कृत उमेदवारी घ्यावी, अशीही चर्चा सुरूवातीला होती. त्यामुळे तुमची भाजपवर नाराजी नाही का, या प्रश्नावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, मला कुणाही पुरस्कृत करावं म्हणून सांगितले नव्हते. मी सगळ्यांना आवाहन केले होते. माझी कुणावरही नाराजी नाही. मी आता मोकळा झालो आहे. भाजपच्या अनेक आमदारांचे मला काल फोन आले. मीही संपर्क करू शकलो असतो. पण मला त्याच इंटरेस्ट नव्हता.

कुणासाठी वाकून खासदारकी घेणार नाही

भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा झाली नाही. चर्चा करायचीही नाही. पण माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही. मला जनता महत्वाची आहे. विचार महत्वाच आहे. मी स्वाभिमानाने राहणार नाही. कुणासाठी वाकून खासदारकी घेऊ शकत नाही. मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य सज्ज झाले आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT