Sanjay Raut, Devendra fadnavis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Devendra Fadnavis : भाजप 'वॉशिंग मशीन'; राऊतांनी फडणवीसांना धू-धू धुतले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आमदार राहुल कुल यांना पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सरकारने 'क्लीन चीट' दिली. सरकारच्या या भूमिकेवर संशयाने पाहत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी फडवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राहुल कुल यांनी शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये चोरले असून, पण फडणवीस हे आपल्या पक्षातील लोकांना वाचवत आहेत, असा नवा आरोप करीत राऊतांनी एकाच वेळी फडणवीस, कुल यांना लक्ष्य केले. (Latest Political News)

राज्यातील उद्योग बाहेर जात असताना सरकाने लोकांचे भ्रष्टाचार धुण्याचा उद्योग सुरू केल्याचा घणाघात राऊतांनी केला. ते म्हणाले, "स्वतःचे लोक, इतरांचे लोक धुवून काढायचे. ते स्वच्छ होत नाहीत, मात्र त्यांची 'रंगसफेदी' करायची. 'क्लिन चिट' द्यायची, हा सरकारचा उद्योग जोमात सुरू आहे."

कितीही पुरावे दिले तर सर्व काही भाजपच्याच ताब्यात असल्याने चौकशीविना घोटाळेबाजांना 'क्लिन चिट' दिली जात असल्याचा हल्लाबोल केला. "मी पुरावे गृहमंत्री फडणवीसांना भीमा पाटस काखान्यातील ५०० कोटींच्या 'मनी लॉन्ड्रिंग'प्रकरण 'ऑडिट'सह पाठवलेले आहेत. आता लेखापरिषद त्यांचे, चौकशा, विधिमंडळ, उत्तरही सरकारचेच. त्याचेच हे परिणाम आहेत",असा टोलाही राऊतांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

आता कुणीही मोठे आर्थिक घोटाळे करतील आणि भाजपच्या वळचणीला जाऊन स्वच्छ होतील, अशी भीतीही राऊतांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "कारखान्यातील संपूर्ण प्रकरणातील त्रूटी, घोटाळ्यांबाबत सविस्तर माहिती गृहमंत्री फडणवीस, 'ईडी', 'सीबीआय' दिलेली आहे. मात्र कुठल्याही चौकशीशिवाय त्यांच्याकडून क्लिनचिट देण्यात येत आली आहे. त्यामुळे आता कुणीही घोटाळे करावेत आणि भाजपच्या 'वॉशिंग मशीन'मध्ये जाऊन धुवून निघावे असा पायंडाच पडला आहे."

दौंड न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगताना संजय राऊत म्हणाले, "दौंड न्यायालयाने सीआरपीसी २०२ नुसार नामदेवराव ताकवणे यांच्या तक्रारीला महत्व देऊन कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, लेखापरिक्षक यांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय न्यायालयाने तसे दिलेले नाहीत. कारखान्याच्या सभासादांची आवस्था वाईट झाली आहे. उद्या आमचे सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांवर कारवाई करणार."

आपल्या लोकांना वाचवण्यासाठी धुण्याचा कारखानाच भाजपने काढल्याचा घणाघात त्यांनी केला. राऊत म्हणाले, "आता गृहमंत्र्यांना एवढे माहिती आहे की घोटाळा करणारा आपल्या पक्षाचा आहे, त्याला वाचवले पाहिजे. दादा भुसे, अब्दुल सत्तार यांनाही 'क्लिन चिट' मिळेल कारण त्यांनी धुवून काढायचा कारखानाच उघडला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT