Raj Thackeray, Sanjay Raut. Sarkarnama
मुंबई

Raj-Uddhav Thackeray Unity : राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला अन् सगळं राजकारणच फिरलं, एकत्र येण्याआधी पडद्यामागं काय घडलं?

Sanjay Raut Uddhav Thackeray Raj Uddhav Thackeray: संजय राऊत म्हणाले, मी लगेच उद्धवजींना सांगितले की मनसे प्रमुखांचा फोन आला होता. त्यावर उद्धवजी यांनी सांगितले की मराठी माणसाचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे.

Roshan More

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!, असे ट्विट करत संजय राऊत यांनी राज ठाकरे हे पाच तारखेला काढत असलेल्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे हे सात तारखेला होणार कृती समितीच्या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, त्यांनी अचानक आपला निर्णय का बदलला? पडद्यामागे नेमकं काय घडलं? याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले.

संजय राऊत म्हणाले, आम्ही कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची तारीख मातोश्रीवर जाहीर केली. आमची बैठक त्यावेळी सुरू होती. मी जेव्हा बैठकीतून बाहेर आलो तेव्हा राज ठाकरेंचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरेंनी सात तारखेला आंदोलन करायचे ठरवले आहे तर मी सहा तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसाचे आणि मराठी भाषे संदर्भातील दोन मोर्चे निघणे हे बरं दिसत नाही. जर एकत्र आंदोलन झाले तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल.'

पुढे बोलताना राऊत म्हणाले, मी लगेच उद्धवजींना सांगितले की, मनसेप्रमुखांचा फोन आला होता. त्यांनी अशी भूमिका मांडली आहे. उद्धवजी यांनी सांगितले की मराठी माणसाचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. आपण मराठी माणसं मराठी भाषेवर हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे. आणि वेगळा मोर्चा काढण्याविषयी भूमिका नाही.

आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे. आपण सात तारखेची तारीख यासाठी ठरवली आहे की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे. राज्यात आषाढीचा उत्सव असतो. मराठी माणसापर्यंत आंदोलन पोहोचवणे अडचणीचे जाईल. आपण पाच तारखेला किंवा सात तारखेला एकत्र येऊन मोर्चा करू शकतो, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले.

मी उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना फोन करून सांगितली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून परत मला फोन करून पाच तारखेला मोर्चा काढण्याविषयी सांगितले, असे संजय राऊत म्हणाले.

सरकारची भूमिका राज ठाकरेंना पटली नाही

संजय राऊत म्हणाले, भाषा म्हणून आमचा हिंदीला विरोध नाहीये. पण शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला अशाप्रकारे जबरदस्ती करता येणार नाही. यावर अनेक मराठी भाषीक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत. मराठी भाषेच्यासाठी काम करणाऱ्या संस्था या राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना भेटल्या आहेत. राज ठाकरेंना जे सरकारकडून हिंदीच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण झाले ते बहुतेक त्यांना पटलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT