Ravindra Chavan, Eknath Shinde
Ravindra Chavan, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

'त्या' वक्तव्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले?

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan-Dombivali) रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर थेट निशाणा साधला होता. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची झोड उठविली होती.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची चर्चा असतानाच शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजप गटात नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गटाची ही नाराजी चव्हाण यांना भोवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामावरुन भाजप व शिंदे गटात शीत युद्ध सुरु आहे.

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी रस्त्यांच्या कामाचा रद्द केलेला निधी मंजुर करत केलेले पाप धुवून काढावे, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन शिंदे गटाने नंतर मंत्री चव्हाण यांना 13 वर्षात विकास कामे रखडवून जे पाप चव्हाण यांनी केले ते पाप झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका केली होती.

शिंदे गटाला अप्रत्यक्ष रित्या ठाकरे गटाचा देखील पाठींबा मिळाल्याचे या दिवसांत पहायला मिळाले. ठाकरे गटाने मंत्री चव्हाण यांच्यावर टिका करत आता तरी कल्याण-डोंबिवलीकडे लक्ष द्यावी, अशी सूचना केली. त्यानंतर मनसेने मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पाठिंबा देऊ केला. यावरुन मनसे व शिंदे गटात ट्विटर वॉर रंगल्याचे पहायला मिळाले आहे.

शहरात या घडामोडी सुरु असतानाच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नुकतीच शंभुराजे देसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. देसाई हे सातारा जिल्ह्यातील आहेत. 26 जानेवारीला ठाणे जिल्ह्याच्या ध्वजवंदनाचा मान चव्हाण यांना दिला गेला होता. त्यानंतर कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. त्यात चव्हाण यांना पालघर व सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकत्व दिले आहे.

तर ठाण्याचे पालकत्व देसाई यांच्या खांद्यावर देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. चव्हाण यांनी केलेले ते वक्तव्य शिंदे गटाच्या जिव्हारी लागले असून यामुळेच ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाण यांनी गमावले आहे का? याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT