Eknath Shinde| Amit Shaha|
Eknath Shinde| Amit Shaha| 
मुंबई

Maharashtra Politcs| शिंदे गट ग्रामविकास आणि जलसंपदा'साठी आग्रही

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. पण दिल्ली दौऱ्यावर असूनही एकनाथ शिंदेंची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यांशी भेट झाली नव्हती. पण काल रात्री उशीरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची भेट घेतली. आता या भेटीची कारणे समोर आली आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट मिळालेल्या खात्यांबाबत असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामीण भागाशी निगडित एखादं-दुसरे खाते मिळावं, अशी शिंदे गटातील मंत्र्यांची इच्छा होती. सध्या फक्त कृषी आणि फलोत्पादन हीच ग्रामीण भागाशी सबंधित खाती शिंदे गटाकडे आहेत. पण ग्राम विकास ,जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते शिंदे गटाला हवे आहे. यांपैकी दोन खाती मिळण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप पक्षश्रेष्ठीशी चर्चा करायला दिल्लीत गेल्याचे बोलले जात होते पण रात्री उशिरापर्यंत त्यांची भेटच झाली नव्हती. अखेर रात्री उशिरा ही भेट झाली. या भेटीचे फोटोही त्यांनी आपल्या ट्विटवर शेअर केले आहेत.

दरम्यान शिंदे फडणवीस दोघेही पुन्हा दिल्लीत जाण्याची शक्यता आहेत. 27 तारखेला होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील उद्योग वाढ, राजकीय मुद्द्यांवरही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावेळीही मनाप्रमाणे महत्त्वाची खाती न मिळाल्याने शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर हे नाराज असल्याची चर्चा होती. दादा भुसे यांना बंदरे आणि खनिकर्म हे दुय्यम दर्जाचे खातं दिल्याने ते सर्वाधिक नाराज असल्याचं बोललं जात होतं. तर संदीपान भुमरे यांना रोजगार हमी, फलोत्पादन हे जुनेच खाते मिळाल्यानं तेही नाराज होते. तर शालेय शिक्षण हे खाते मिळूनही दीपक केसरकर हेदेखील मिळालेल्या खात्याबाबत फारसे खूश नसल्याची चर्चा होती. केसरकरांना यापेक्षा अधिक महत्त्वाचे खाते मिळण्याची अपेक्षा होती.

दूसरीकडे, एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सर्व ४० आमदारांना मंत्री व्हायचे आहे, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने भाजपचे १०५ आमदार नाराज आहेत. शिंदे गटासोबत गेलेले काही आमदार खासगीत सांगतात की, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT