Sanjay Raut, Suhas Kande
Sanjay Raut, Suhas Kande sarkarnama
मुंबई

कांदेंचे मत राऊतांच्या कोट्यातील? ५ कारणांमुळे मत झाले बाद

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये (Rajya Sabha election) चांगलीच चुरस आहे. त्यासाठी एक- एक मत महत्त्वाचे आहे. अशात आता शिवसेनेला (Shivsena) धक्का बसला असून आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिली आहे. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड व भाजपचे (BJP) मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आले आहेत.

सुहास कांदे यांचे मत हे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोट्यातील असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना काहीशे टेन्शन असणार आहे. मात्र, शिवसेनेने संजय राऊत यांना ४२ मते दिली असल्याचे समजते. कांदे यांचे मत बाद झाल्यामुळे राऊत यांचे एक मत कमी झाले आहे. तरीही त्यांच्याकडे ४१ मते आहेत.

तब्बल ६ तासांच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेरीस आक्षेप घेण्यात आलेल्या ५ मतांपैकी केवळ शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. घडी न घालता मतपत्रिका बाहेर आणणे, आपल्या पक्ष प्रतोदासह मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदाला दाखविणे हे भाजपचे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले, असून त्यांचे मत बाद ठरविण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला परवानगी दिली आहे. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून पुढच्या २ तासांमध्ये निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. एक मत कमी झाले तरी काही फरक पडणार नाही, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. तसेच चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT