BMC Election : मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत थेट लढत होणार आहे. मात्र, मतदानाला 24 तासांपेक्षा कमी कालावधी असताना भाजपने जी घोषणा विधानसभेला दिली होती. तीच घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिलेदाराने दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून एक है तो सेफ है ही घोषणा दिली होती. त्या घोषणेच्या धर्तीवर आज खासदार संजय राऊत यांनी 'सर्व मराठी माणसाचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे!' अशी घोषणा दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत ही घोषणा दिली आहे. या घोषणमध्येच त्यांनी पुढे ठाकरेच बेस्ट आहेत, असे म्हटले आहे.
विधानसभेला लाडक्या बहिणीच्या योजनेसोबत भाजपने एक है तो सेफ है चा नारा देत निवडणूक फिरवली होती. आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र आले असताना मराठी माणसाचं ठरलंय एक आहोत सेफ आहोत, अशी घोषणा देत मराठी मतं ठाकरेंसोबत असतील, असा दावा केला आहे.
मुंबईत मराठी मतदार नेमके किती आहेत यावर वेगवेगळे आकडे सांगितले जात आहे. राज ठाकरे आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, आम्ही सर्व्हे केला आहे. मुंबईत मराठी माणूस 40 ते 41 टक्के आहे. तर, गुजराती 13 टक्के आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.