BJP Sarkarnama
मुंबई

ठाकरे सरकारला दणका; भाजपच्या बारा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

विधानसभेत करण्यात आलेले निलंबन बेकायदेशीर असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राज्यातील भाजपच्या (BJP) 12 निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. हे निलंबन असंविधानिक असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने शुक्रवारी हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारला दणका बसला आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Reservation) केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला होता. यावेळी अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या 12 आमदारांना एका वर्षांसाठी 5 जुलै 2021 मध्ये महाराष्ट्र विधानसभेने ठराव करत निलंबन केले होते. यानंतर निलंबनाच्या कारवाईविरोधात या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आमदारांचे निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय असला तरी 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले होते. या प्रकरणावर शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हे निलंबन असंविधानिक असल्याचे स्पष्ट केले. तसेच बारा आमदारांना दिलासा देत निलंबन रद्द केले.

निलंबित आमदारांमध्ये आशिष शेलार, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. त्यांना आता दिलासा मिळाला असून आगामी अधिवेशनात त्यांना सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT