Bhagatsingh koshyari| Sharad Pawar
Bhagatsingh koshyari| Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

शिवरायांविषयी राज्यपालांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी आक्रमक

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आपल्या देशात गुरुची परंपरा आहे, गुरुचे महत्त्व मोठे आहे समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. समर्थ रामदासांमुळे सत्ता मिळाली असे शिवाजी महाराज म्हणाले. (Bhgat singh Koshyari) गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या देणार म्हणाले होते. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. (Shivaji Maharaj) राजा-महाराजा चक्रवर्ती सब, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा ? असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानामुळे नव्या वादाची ठिगणी पडण्याची चिन्ह आहे. राज्यपालांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत राज्यपालांना शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते, जे लोक सांगतात ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू त्यांच्या आई जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर त्यावेळी रामदास स्वामी नव्हते हेच दिसून येईल.

याचसोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा व्हिडीओ शेअर करत राज्यापालांना सणसणीत टोला लगावला आहे. शरद पवार यांनी संबंधित व्हिडीओमध्ये केलेल्या भाषणातील काही विधाने त्यांनी ट्विट केली आहेत.

'शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.' छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं...रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी... त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.” असंही सुप्रिया सुळेंनी म्हटंल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT