Sanjay Raut , Eknath Shinde
Sanjay Raut , Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ..शिंदे गटाचे लोकं काय धुणीभांडी करायला ठेवणार का ? ; राऊतांचा टोला

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. सत्तारांवर गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्तार आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार केली चांगली गोष्ट आहे. सत्तारही काल म्हणाले की, माझ्याच पक्षातील नेत्याने माझ्याविरोधात कट रचला आहे. माझ्याच गटातले लोक माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात की, त्यांच्या गटात काय सुरू आहे. या गटात असलेल्या अंतर्गत वादामुळे हे सरकार जास्तकाळ टीकणार नाही. हा कटही टीकणार नाही,"

महाराष्ट्रात जर भाजपचे 145 जण असतील तर शिंदे गटाचे लोकं काय धुणीभांडी करायला ठेवणार का? भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कुणी उभे करत नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

राऊत म्हणाले, “विधानसभेत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या विकासावर भाष्य करण्यासाठी संधी मिळते. जनतेच्या विकासावर आणि योजनांवर बोलण्याची संधी असते. मुख्यमंत्री जर विधानसभेत उखाळ्या पाकाळ्या काढत असतील, तर राज्याच्या विकासावर कोण बोलणार?,

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण म्हणजे गल्लीतील भाषण आहे. त्यांना बेकायदेशीरपणे संधी मिळाली असली तरी, त्यांनी सय्यमाने बोलणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलत असताना भान ठेवले पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे, कशी घालमेल सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो आहे की हे सरकार टिकणार नाही, आणि हा गटही टिकणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर यांचे अंतिम ध्येय भाजपमध्ये विलीन होणे आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, "केसरकरांना वाटतंय शिंदे-ठाकरेंनी सोबत यावे, याचा अर्थ असा की त्यांनी आत्मपरिक्षण केले आहे. त्यामुळेच असे विधान बाहेर पडताय. शिंदे गटात टोळी युद्ध सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचे वक्तव्य म्हणजे वैफल्यग्रस्त असून त्यांच्यामध्ये अजून गट पडले असल्याचे दिसून येत आहे. तर 16 आमदार अपात्र ठरतील कारण आमची कायदेशीर बाजू अगदी सक्षम आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT