Deputy Chief Minister Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Onion Issue: राज्य सरकारही कांद्याबाबत पुढाकार घेईल; अजित पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात गदारोळ सुरु आहे. कांदा निर्यातीवर शुल्क वाढ केल्यामुळे महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले असतानाच केंद्र सरकारने मोठी घोषणा करत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आभार मानले. तसेच वेळ पडली तर राज्य सरकारही कांद्याच्या संदर्भात पुढाकार घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

"जैन उद्योग समूह हा कांद्यावर प्रक्रिया करत आहे. नुकतेच उद्योग पुरस्कार मिळालेले विलास शिंदे सह्याद्री फार्म हे देखील कांदा आणि टोमेटोवर काम करत आहेत. सरकारही शेतकऱ्यांच्या पाठिशी असून कांद्याच्या संदर्भात मुख्यमंत्री वारंवार सर्व नेत्यांच्या संपर्कात आहेत", असेही अजितदादांनी सांगितले.

"सरकारची भावना एकच आहे, आम्हाला उत्पादक व ग्राहक दोघांचाही विचार करावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कांदा साठवणुकीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात मागणी केली आहे. सध्या सर्व ठिकाणाहून कांद्याची विक्री सुरू आहे".

"कांदा निर्यातीबाबत लावण्यात आलेल्या टॅक्सबाबतचाही विचार करावा, हे देखील आमचं मत आहे. कारण शेतकरी नाराज आहे. पण केंद्र सरकारने २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराच्या खरेदीची घोषणा केली आहे. यामध्ये आणखी गरज पडली तर राज्य सरकार देखील पुढाकार घेईल", असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT