India Alliance News Sarkarnama
मुंबई

India Alliance News: 'इंडिया आघाडी'वर केजरीवाल नाराज? मुंबईतील बैठकीला 'आप' अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी 'इंडिया आघाडी'ची स्थापना केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका झाल्या असून आता तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे.

'इंडिया आघाडी'च्या माध्यमातून विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांच्या या आघाडीत देशातील २६ राजकीय पक्षांचा समावेश आहे. पण मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या आधीच 'इंडिया आघाडी'त फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. कारण या बैठकीला आम आदमी पक्ष अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी सात जागा लढवणार असल्याचेही जाहीर करून टाकले. त्यामुळे यावरूनच आम आदमी पक्ष काँग्रेसवर नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

आम आदमी पक्षाबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. तर 'आप'कडूनही नाराजीचा सूर उमटत आहे. जर दिल्लीत काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असेल तर 'इंडिया आघाडी'च्या बैठकीला कशासाठी जायचं?, असा सवाल 'आप'कडून उपस्थित करण्यात येत आहे.

असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार आहेत. त्यामुळे आम आदमी पक्ष 'इंडिया आघाडी'च्या बैठकीला खरंच अनुपस्थित राहणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT