महाविकास आघाडीतील नेते
महाविकास आघाडीतील नेते sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांचा सोमवारी `महाराष्ट्र बंद`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : लखीमपूरमध्ये (Lakhimpur) शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याच्या घटनेवरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आणि सोमवारी (ता.११) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत शिवसेने या ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना मारणाऱ्या सरकारला भानावर आणण्यासाठी हा ‘बंद’ यशस्वी करण्याचा निर्धार शिवसेनाचा आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार या काळात बंद राहणार आहेत. ‘महाराष्ट्र बंद’च्‍या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली.

लोकांना गृहित धरलेल्या मोदी सरकारने आता थेट शेतकऱ्यांना संपविण्याचे पाऊल उचले असून, अशा सरकारलाच संपविण्यासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, की शेतकरी हा एकाकी पडलेला नाही, तर त्यांच्यासोबत प्रत्येक नागरिक असल्याचे दाखविण्यासाठीच हा बंद आहे. शेतकऱ्यांची ताकद दाखविण्याची ही वेळ आहे. इतर राज्यांतही टप्प्याटप्प्याने हा ‘बंद’ करण्यात येणार असून, संपूर्ण देशातील लोक आता सरकारला वठणीवर आणणार आहेत.

भाजप हा पक्ष शेतकऱ्यांचा नाही तर शेतमालावर डल्ला मारणाऱ्यांचा पक्ष होता. आता तर भाजप शेतकऱ्यांना चिरडून मारणारा देखील पक्ष बनला आहे. या जुलमी सरकारला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त १२ कोटी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा दयावा, अशी मागणी मलिक यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT