Maharashtra Monsoon Session :  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session : गडचिरोलीच्या आमदाराचा अजब दावा ; 'विकास झाला, आता निधी नको ' ; आदिवासी विद्यार्थी आक्रमक..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : निधी वाटपावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना गडचिरोली आमदार देवराव होळी यांनी केलेल्या एका अजब दाव्यामुळे सभागृहातील सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला मिळणारा 'सीएसआर'चा तीस टक्क्यांचा विशेष निधी बंद करा, अशी अजब मागणी आमदार होळींनी केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे गडचिरोली परिसरातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. समाजमाध्यमांवर होळींच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

"गडचिरोलीत झालेला विकास दाखवा," असे आवाहन आदिवासी विद्यार्थ्यांनी आमदारांना केले आहे. आरोग्य, शिक्षण, पूल, रस्ते,पाणीपुरवठा,अन्न सुरक्षा याबाबतीत नवे वाद समोर येत असताना होळी यांनी केलेली मागणी संतापजनक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

गडचिरोलीचा विकास झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त तीस टक्के निधी दिल्याने सरकारचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या मागणीमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

विधिमंडळातच त्यांनी आदिवासी जिल्हा म्हणून 10 टक्के व अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून 20 टक्के असा 30 टक्के सीएसआरचा अतिरिक्त निधी दिला जातो. परंतु गडचिरोलीचा विकास झाला असून आता या निधीची आवश्यकता नाही, अशा प्रकारची मागणी केल्याची क्लिप सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT