Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

'मातोश्री'वरील बैठक संंपली; उद्धव ठाकरेंचा समर्थकांना महत्त्वाचा संदेश...

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray| मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी सर्व शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर 'जनतेला संयम बाळगायला सांगा' असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यासोबतच आज संध्याकाळी उद्धव ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज दुपारी 'मातोश्री'वर उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंना भेटलो. आयोगाच्या निर्णयामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. पण आपल्या लोकांनी संयम बाळगावा, उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार आहे. निवडणूक आयोगाने जरी आमचे सर्व मार्ग बंद केले असले तरी जनतेच्या न्यायालयात आमचा फैसला होईल. आगामी निवडणुकांमध्येच जनता आम्हाला न्याय देईल, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. अनेक शिवसैनिकांना अश्रू आनावर होत आहेत. पण जनतेला संयम बाळगायला सांगा, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

तसेच, पर्यायी चिन्ह आणि पक्षाचं पर्यायी नाव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. पर्यायी चिन्ह पोहोचवण्यासाठी आयोगाने आज 2 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. आपल्याकडून चिन्ह पोहचवण्याचे काम झालं आहे. आता आयोग निर्णय काय देतो, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT