Uday Samant : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच सर्व चर्चांवर आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"एखादं मिशन राबवायचं असताना ते सांगायचं नाही. पण अनेक लोक संपर्कात असून टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल", असं म्हणत त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकारांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत काही खासदार शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चा आहेत, हे खरं आहे का? असा प्रश्न विचारताच उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणतं मिशन राबवण्याची आवश्यकता नाही.
कारण आता काही लोकांना कळून चुकलं आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्याच (Eknath Shinde) नेतृत्वाखाली चालते. त्यामुळे अनेक लोक संपर्कात असून टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल हे देखील निश्चित आहे."
तर यावेळी सामंत यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंचं नेतृत्व चांगलं असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणाले, "शिवसेनेत लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. लोकप्रतिनिधींना आता समजलं आहे की, एकनाथ शिंदेंचे नेतृत्व उबाठा गटापेक्षा चांगले आणि संवेदनशील आहे, त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.