Vijayi Melava News : सरकारने हिंदी अंमलबजावणीचे दोन जीआर रद्द केल्यानंतर विजयी मेळावाचे आयोजन ठाकरे बंधुंकडून करण्यात आले आहेत. या मेळाव्यात कुठल्याही पक्षाचे झेंडे असणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील या मेळाव्याला पाठींबा दिला आहे. ठाकरे बंधु तब्बल 18 वर्षानंतर एकाच मंचावर येत आहेत.
या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पहिले कोण बोलणार आणि शेवटी कोणाचे भाषण होणार याची उत्सुकता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आहे. शेवटी कोणाचे भाषण होणारी याची माहिती समोर आली आहे.
'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार विजयी मेळाव्याच्या मंचावर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनच बंधु असतील. बाकीच्या नेत्यांची आसनव्यवस्था ही मंच्याच्या खाली असेल. या मेळाव्यात प्रथम राज ठाकरे बोलणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल आणि या भाषानंतर मेळावा संपेल.
उद्या (पाच जुलै) वरळीमधील एन सी आय डोममध्ये विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टिने मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते एकत्रित सभास्थळाची पाहाणी करून उद्याच्यासभेचे पूर्वनियोजन कसे असणार याचा आढावा घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.