Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

'' देवेंद्र फडणवीस भाजपाची रंग बदलणारी राजकीय औलाद..''; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

बुलढाणा : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे,त्यांच्याकडून वीजबिल वसूली करू नये अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर त्याच फडणवीसांनी शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करावीच लागेल, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याशिवाय पर्याय नाही अशाप्रकारची भूमिका घेतली आहे. याचमुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविरुध्द तीव्र नाराजी असून फडणवीस हे भाजपाची रंग बदलणारी राजकीय औलाद आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते व खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ( Vinayak Raut Latest News)

राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबिल थकीत आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून सुरु आहे. आता यावरुनच सत्ताधाऱ्यांना को़ंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महावितरणच्या कारवाईवरुन ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याच मुद्दयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनीही टिवि्टद्वारे उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शनिवारी (दि.26) शेतकरी मेळावा होणार आहे. या स्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आले होते. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या वीजबिलाच्या प्रश्नावर खरं रूप दाखवलं असून बील भरावंच लागेल असं म्हटलं आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच फडणवीस वीजबिल माफ करा म्हणत होते. त्यामुळे उद्याच्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष दिसून येईल.

राऊत म्हणाले, फडणवीस हे भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद असून त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.त्यांनी विरोधात असताना शेतकऱ्यांची वीजबिल वसुली करु नये. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांकडून वीजबिल वसूल करू नये अशी मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूप संतापले आहे असेही राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे..?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टिवि्ट केलं होतं. यात त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करत वीजबिल वसुलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सुळे यांनी टिवि्टद्वारे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT