Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : महापालिकांच्या निवडणुका कधी घेणार? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला सवाल

Mangesh Mahale

Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोग आज (सोमवारी) दुपारी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला आव्हान केले आहे. "मुंबई महापालिकेसह १४ महापालिकेच्या निवडणुका तुम्ही कधी जाहीर करणार? असा थेट सवाल राऊतांनी आयोगाला केला आहे. पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

"पाचही राज्यांमध्ये आमची इंडिया आघाडी एकत्र लढेल आणि पाचही राज्यांमध्ये आम्ही विजयी होऊ," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. "निवडणूक आयोग पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करीत आहे. त्याबरोबर मुंबई महानगरपालिकेसह १४ महापालिकेवर जे प्रशासक नेमलेले आहेत. त्याच्या माध्यमातून हे सरकार कारभार करत आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. अनागोंदी माजली आहे. महापालिकेच्या निवडणुकांबाबतसुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे," असे राऊत म्हणाले.

मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगढ या पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन घोषित करणार आहे. निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांना भेटी देण्यात आल्या. ज्यानंतर पाचही राज्यांची संपूर्ण माहिती घेऊन निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची संभाव्य ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाच राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे, तर डिसेंबर महिन्यातच या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकालदेखील जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT