Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil : आरक्षण द्यायचेच नसेल, तर 40 दिवसांचा वेळ का मागितला? मनोज जरांगे संतापले...

Chetan Zadpe

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षण मिळावे, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळावेत, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी नुकतीच अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे विराट सभा घेतली होती. या वेळी त्यांनी सरकारला दहा दिवसांत आरक्षण द्या, असे म्हणत मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारला अल्टिमेटम दिला होता. यावर आता मनोज जरांगेंनी मोठे विधान केले आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका खासगी वृत्तवाहिनीला जरांगे यांनी मुलाखत दिली. या वेळी त्यांनी यावर भाष्य केले. "मराठा समाज हाच एकटा सरकारसाठी पुरेसा ठरणारा आहे. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नसेल, तर मग आंदोलनस्थळी येऊन ४० दिवसांचा वेळ का मागितला? या प्रश्नी समितीची स्थापना का केली? सरकारने आम्हाला सांगितलं आहे की, संपूर्ण मराठा समाज हा कुणबीमध्येच दाखल होतो. आता जर आरक्षण मिळालं नाही, तर २४ तारखेला सगळं काढणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

"छगन भुजबळ यांना वाटलं की, आम्ही सभेसाठी जमीनच खरेदी केली. म्हणून त्यांनी सात कोटींचा आकडा सांगितला असेल. सभेला जे काही आवश्यक होतं, त्यासाठी काहींनी जमीन उपलब्ध करून दिली होती. केवळ 22 गावांतूनच 21 लाख रुपये जमा झाले आहेत. हे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्या जातीसाठी आम्ही कष्टातून पैसे दिले आहेत, असे जरांगे म्हणाले.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT