Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

अधिवेशनातून निघून का गेले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पण मी अधिवेशनातून उठून गेलो म्हणून माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. राष्ट्रीय अधिवेशन असल्याने मी बोललो नाही. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून ते आधी बोलले. असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपिठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण आधी सुरु झाले आणि त्यांचे भाषण सुरु होताच अजित पवार उठून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. ''मी नाराज नाही आणि मला बोलण्यापासूनही कोणी अडवलं नव्हतं. राज्यपातळीवर काही सभा, अधिवेशन असेल तर मी बोलतो, पण राष्ट्रीय पातळीवर बोलत नाही. मीच नाही तर वेळे अभावी तिथे आलेले अनेक जण बोलू शकले नाहीत. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

याचवेळी त्यांनी राज्यातील लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाबाबत भाष्य करत राज्य सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे. राज्यातील शेकडो जनावरे लम्पीग्रस्त झाली आहेत. अनेक जनावरे दगावली आहेत याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जनजीवनावरही होणार आहे. गाळप हंगाम सुरु झल्यावर लम्पीचा प्रसार वाढेल, लम्पी आजारामुळे दुग्धव्यावसायावर परिणाम होणार आहे. आजारग्रस्त गाईचे दुध प्यायल्यावर काही परिणाम होतो का, त्याबाबत राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहेत.

लम्पी आजजारग्रस्त गाईंच्या डोळ्यातून पाणी येत, नाका-तोंडातून चिकट द्रव बाहेर पडतो, तो चाऱ्यावर पडतो, शरीरावर गाठी दिसू लागतात आणि तोच चारा इतर जनावरांच्या पोटात गेल्यावर इतर जनावरांनाही संसर्ग होतो. असे निरीक्षण समोर आले आहे. राज्यसरकाने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी आणि उपाययोजना कराव्यात, सरकारी यंत्रणांनीही तातडीने खबरदारी घ्यावी, प्रचार आणि प्रसार करावा, अशी मागणी मी विरोधीपक्षनेता म्हणून करत आहे. तसेच, जनावरांच्या लसीकरणात अडथळे येत आहेत. सध्या देशपातळीवरील कंपन्या लस तयार करत आहेत. महाराष्ट्रात लस तयार करणारी कंपनी असेल तर राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, विरोधी पक्षनेता म्हणून ही गोष्ट लक्षात आणू देऊ इच्छितो.

तसेच, हा आजार विम्यात कव्हर झालेला नाही, त्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी बोलून हा आजार विम्यात कव्हर करण्यासाठी मागणी करावी. भारतात लस नसेल तर परदेशातून लसी मागवा, पण शेतकऱ्यांची जनावरे वाचवा, अशी मागणी मी विरोधीपक्षनेता म्हणून करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT