Will MNS and BJP Come together in Future
Will MNS and BJP Come together in Future 
मुंबई

महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भाजप-मनसे एकत्र येणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपची शिवसेनेबरोबर मागील 25 वर्षापेक्षा जास्त युती होती. मात्र ही युती मोडून तीन पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात स्थापन झाले. यामुळे भाजपला राजकीय धक्‍का बसल्याचे मानले जाते. यातच काही दिवसापूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गडात भाजपचा धक्‍कादायक पराभव झाला. यामुळे राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज भाजपला आल्याने भाजपने नवीन मित्राचा शोध घ्यायला सुरूवात केल्याचे सांगितले जाते. 

यामुळे शिवसेनेतून बाहेर फुटून निर्माण झालेला मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेउ शकतो, असे भाजपमधील धुरिणांना वाटत आहे. याचा लाभ शहरी भागात भाजपला होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात मनसेची ताकद आहे. याचा लाभ होईल. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी मनसेची उपयुक्‍तता मोलीची आहे, असा अंदाज भाजपमध्ये लावला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT