Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : ''शिंदे सरकार 'या' तारखेला कोसळणार''

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडानंतर शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली.

मात्र, आता सरकार कोसळणार असल्याचा दावा काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

''शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचा निकाल १४ फेब्रुवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्ट याबाबतचा निर्णय १४ फेब्रुवारीला देईल. त्यामुळे हे सरकार कोसळणारच आहे'', असा दावा नाना पटोले यांनी केलाय. तसेच ''शिंदे-फडणवीस हे सरकार असंविधानिक सरकार आहे'', असेही पटोले म्हणाले. आज अकोल्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारसभेत बोलताना पटोलेंनी हा दावा केला आहे.

अमोल मिटकरी ट्विटमध्ये काय म्हणाले?

''या सरकारचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की'', असं ट्विट मिटकरींनी केलं आहे. तर नाना पटोले (Nana Patole) यांनीही हे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पटोले आणि मिटकरी यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या आधीही शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील हे सरकार फेब्रुवारीमध्ये कोसळणार असल्याचे भाकीत केले होते. तर आता नाना पटोले आणि अमोल मिटकरी यांनीही हे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT