नगर

कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ  बसणार नाही : आदित्य ठाकरे   

सरकारनामा

श्रीरामपूर :  राज्यातील शेतकऱ्यांना विसरुन चालणार नाही. कर्ज मुक्ती झालीच पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नव्हे. शेतकरी हा गुन्हेगार नाही. आज कर्ज मुक्ती होत असली, तरी त्यात अनेक ठिकाणी गोंधळ आहे. काहीना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. परंतू बॅकेत पैसे जमा झाले नाहीत. तसे झाले असेल तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

जन आशिर्वाद यात्रेनिमित्त येथील आझाद मैदानासमोरील मुख्य रस्त्यावर आज आयोजित विजय़ संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, " सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ  बसणार नाही. शिवसेना शेतकऱयांसोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा देवुन लढणार आहे. शेतकरी आणि शिवसेना वेगळी नाही. आपले रक्त एकच आहे. ही यात्रा मत मागण्यासाठी नाही. आगामी निवडणुकीसाठीही नाही. तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी तसेच सुजलाम सुफलाम व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी ही तिर्थयात्रा आहे. आज सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ, वीजेची कमरता, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवरील कर्ज यासारख्या विविध प्रश्व सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे . " 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT