नगर

प्रकाश आंबेडकरांची २२ जागांची मागणी रास्त नाही!

सरकारनामा ब्युरो

अकोले (नगर): राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय नेते शरद पवार यांना आहेत. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, डॉ. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी त्यांच्या धोरणानूसार २२ जागेची मागणी करीत आहे. ही बाब रास्त वाटत नाही. त्याबाबत त्यांनी योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा प्रश्न राहिला आहे, असे मला वाटत नाही. 

अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देणे व पक्षप्रवेश हे दोन्ही वेगवेगळे असून, त्याबाबत माझा अभ्यास नसल्याचे सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. या वेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले शिवाजीराव नागवडे हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने राजेंद्र नागवडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT