नगर

अकोले तालुक्याच्या भल्यासाठी भाजपात चाललोय!

सरकारनामा ब्युरो

नगर : अकोले तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला आहे. आगामी काळात तालुक्याच्या भल्यासाठी आपण उद्या (ता. २८) मुंबईत जाऊन आमदारकीचा राजीनामा देणार आहोत, तसेच येत्या दोन दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहोत, अशी घोषणा आमदार वैभव पिचड यांनी करून राष्ट्रवादीला रामराम केला.

अकोले येथे आज दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. आमदार पिचड म्हणाले, तालुक्यात निळवंडेच्या कालव्यांचा प्रश्न रखडलेला आहे. आदिवासींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. काळाच्या ओघात बदलावे लागेल. आपला बदल हा विकासाच्या दिशेने हवा. त्यामुळे आपण येत्या ३० तारखेला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT