नगर

नरेंद्र मोदी- अमित शहा हे 370 वर बोलणारच: विखे

सरकारनामा ब्युरो

शिर्डी (नगर) : "विधानसभेची निवडणूक असली, तरी प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे काश्‍मीर आणि तीनशे सत्तरावे कलम रद्द करण्याच्या निर्णयावर बोलणारच. या माध्यमातून जनतेला एकात्मतेची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ कोल्हार खुर्द, चिंचोली, मांजरी, चांदेगाव, पाथरे खुर्द, टाकळीमियॉं व देवळाली प्रवरा या श्रीरामपूर मतदारसंघातील गावांचा दौरा विखे यांनी केला. त्यांच्या समवेत माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब साबळे आदी होते. या दौऱ्यानंतर विखे पाटील बोलत होते. 

ते म्हणाले, "मोदी व शहा देशाचे नेते आहेत. ते राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार करणार. राज्याच्या प्रश्‍नावर आणि युती सरकारच्या कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर झाला. त्यास सर्वस्वी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार व राज्यमंत्री बाळासाहेब थोरात हेच जबाबदार आहेत. त्या वेळी आपण सरकारात असूनही या कायद्याला विरोध केला. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या वेळी मंत्रिपद सोडण्याची हिंमत थोरातांनी का दाखविली नाही? 2013 मध्ये हा कायदा लागू झाला, त्या वेळी मंत्रिमंडळ बैठकीत व बाहेरही आपण त्यास जाहीरपणे विरोध केला. न्यायालयात जाऊन लढाई केली.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT