नगर

औटी का आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न! 

सरकारनामा ब्युरो

पारनेर (नगर) : आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान युतीचा धर्म पाळला आहे. तरीही कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही, मात्र असा निकाल का लागला त्याचे आत्मचिंतन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. 

विखे आज पारनेरच्या दौऱयावर होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हा दौरा राजकिय नव्हता. पिकाच्या नुकसानीच्या पहाणीसाठी होता. तालुक्यात येताना शिवसेना तालुकाध्यक्ष व
पदाधिकाऱयांना निरोप दिले होते. विजयकुमार औटी यांनासुद्धा कार्यालयातून फोन केला होता. ते आले नाहीत, हा ज्यांचा त्याचा प्रश्न आहे.

विखेंच्या दौरावर बहिष्कार घातल्याचे शिवसेनेचे आवाहन सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यावर विखे म्हणाले, मी त्यांच्या पदाधिकाऱयांच्या सहीनिशी पत्र असते तर मान्य केले असते. जे आले नाहीत त्यांना शेतीचे पंचनामे करायचे असतील. तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांनी तसे पत्र काढले असते तर ते मी मान्य केले असते. आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान यूतीचा धर्म पाळला आहे. कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही. मात्र असा निकाल का लागला, त्याचे आत्मचिंतन करणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT